Type Here to Get Search Results !

7 नोव्हेंबर " विद्यार्ही दिवस माहिती!

विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर - सम्पूर्ण माहिती

📚  ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस उद्देश

 ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस 

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ‘७ नोव्हेंबर’ हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

 📚  उद्देश

या दिवशी १९०० साली बाबासाहेब आंबेडकर यांनी साताराशहरातील राजवाडा चौकात असलेल्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये (तेव्हा 'गव्हर्नमेंट हायस्कूल') पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. त्या वेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. या घटनेचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असलेल्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’ महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💥   संपूर्ण माहिती PDF मध्ये डाउनलोड करा !

📚  हिंदी माहिती 

महाराष्ट्र में अम्बेडकर का स्‍कूल प्रवेश दिवस अब होगा “विद्यार्थी दिवस”

भारतीय संविधान के शिल्पकार और वंचित वर्ग के उद्धारक  डॉ.बी.आर.अम्बेडकर के स्कूल प्रवेश दिवस 7 नवंबर को “विद्यार्थी दिवस” के रूप में मनाने का निर्णय महाराष्ट्र के शिक्षा विभाग द्वारा लिया गया गया है।
7 नवंबर 1900 को पहली बार किया था स्कूल में प्रवेश

बाबासाहेब अम्बेडकर ने सतारा के प्रतापसिंह हाईस्कूल, राजवाड़ा चौक, जिला-सतारा में 7 नवंबर 1900 के दिन प्रथम बार स्कूल में प्रवेश लिया था।
इसी दिन से उनके शैक्षणिक जीवन की शुरुआत हुई थी, उस समय उन्हें भीमा कहकर बुलाया जाता था।
स्कूल में उस समय उनका नाम रजिस्टर में क्रमांक- 1914 पर अंकित था।

जिसके सामने आज भी बालक भीमराव के हस्ताक्षर मौजूद हैं। इस ऐतिहासिक दस्तावेज़ को स्कूल प्रशासन ने बड़े सम्मान और गर्व के साथ सहेज रखा है।
उनके स्कूल में प्रवेश लेने की युगांतकारी घटना एक अर्थ में शैक्षणिक क्रांति की शुरुआत मानी जा सकती है।
सतारा के प्रवर्तन संगठन के अध्यक्ष अरुण जावले ने 7 नवंबर को राज्य शालाप्रवेश दिवस के रूप में घोषित करने की माँग महाराष्ट्र के सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले और शिक्षा मंत्री विनोद तावडे के समक्ष उठाई थी।
उनकी माँग पर दोनों ही मंत्रियों ने बाबासाहेब के शाला में प्रवेश दिवस 7 नवंबर को “विद्यार्थी दिवस” के रूप में मनाने का निर्णय लिया है।
डॉ. बी.आर. अम्बेडकर जीवन में शिक्षा के कारण ही क्रांति कर सके, जिससे भारतीय समाज में अभूतपूर्व क्रांति हुई।
करोड़ों लोगों के लिए किया जीवन भर संघर्ष

शिक्षा पाकर प्रबुद्ध बने बाबासाहेब लाखों-करोड़ों लोगों (जो सदियों से वंचित थे) का ऊद्धार किया।
सम्पूर्ण विश्व में आदर्श संविधान और भारतीय लोकतंत्र को आकर देने वाले महान शिल्पकार के रूप में बाबासाहेब गौरव बने। उनके कारण ही भारतीय समाज में स्वतंत्रता, समानता, बंधुता एवं न्याय के मानवीय मूल्य के बीज रोपित हो सकें।
वे आजन्म विद्यार्थी रहे, और अपनी अंतिम सांस तक शिक्षा ग्रहण की । इसलिए उनके स्कूल प्रवेश दिवस को अत्यंत महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना मानते हुए विद्यार्थी दिवस के रूप में मनाने का निर्णय महाराष्ट्र सरकार द्वारा लिया गया है।
प्रत्येक विद्यार्थी देश का भविष्य है, इसलिए आदर्श विद्यार्थी के निर्माण के लिए विद्यार्थी के रूप में सबसे उच्च आदर्श डॉ. बी आर. अम्बेडकर का जीवन अनुकरणीय है, ताकि विद्यार्थी उनसें प्रेरणा प्राप्त कर सकें।
इस दिन स्कूलों में बाबासाहेब अम्बेडकर के जीवन पर आधारित व्याख्यान, निबंध, प्रतियोगितायें, क्विज कॉम्पिटिशन, कविता पाठ सहित विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जाने के निर्देश दिए गया है।


 📚   मराठी निबंध / भाषण -1 

रत्नागिरी जिल्हा फणस, आंबा यांसारख्या  फळांच्या रत्नाचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. याच जिल्ह्याने लोकमान्य टिळक, साने गुरुजी यान सारख्या थोर नररत्नांना जन्म दिला. रत्नागिरी जवळ आंबवडे नावाचे खेडे आहे. तेथे रामजी सपकाळ नावाचा सरदारी बाण्याचा, जातीने माहार आचरणाने व विचाराने सुसंस्कृत असलेला इसम राहत होता वयाच्या अठराव्या वर्षी त्याने लष्करात प्रवेश केला. शिक्षणाची आवड असल्याने नोकरी बरोबर त्याचे शिक्षणही चालूच होते. लष्करातील मेजर मुरवाडकर यांची थोरली मुलगी भीमाबाई हि रामजीची बायको. भीमा बाई दिसण्यास सुरेख होती. स्पष्टवक्तेपणा मुळे तिचा सर्वांवर वचक होता. ** अश्या या रामजीचे आणि भिमाबाईचे दिवस आनंदात व मजेत चालले होते. रामजीचे बंधू म्हणजे भिमाबाईचे दीर हे संन्याशि होते.
त्यांनी भीमा बाईला भविष्यवाणी केली होती कि तुला महान तेजस्वी मुलगा होईल.  सोमवार दिनांक १४ एप्रिल १८९१ सालची पहाट.अतिशय मंगल पहाट होती ! सूर्य-चंद्र ईत्यादी ग्रहांचा पवित्र मिलाप झाल्याचा तो दिवस होता. तो दिवस भाग्याचा व पुन्न्याचा समजला गेला.त्याच वेळी भीमा बाईला पुत्ररत्न झाले. बाराव्या दिवशी मुलाचे भीमराव असे नाव ठेवण्यात आले.
**  सन १८१४ मध्ये रामजी मेजर च्या हुद्यावर असताना लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते दापोलीस आले. भीमराव तेथील शाळेत जाऊ लागला. पण मुळात भिमाचा स्वभाव खोडकर असल्या मुळे त्याची भांडणे मिटविणे दिवसें दिवस त्यांना जड होऊ लागले. त्या मुळे तें सातार्यास राहण्यास आले.भिमाचा खोडकर स्वभाव जावा म्हणून त्याला क्यमप मध्ये टाकण्यात आले. सातार्याचे वातावरण भीमा बाई ना लाभदायक नव्हते. त्यांची तब्येत वारंवार बिघडत असे. त्यामुळे त्यांनी कायमचे अंथरून घरले. आणि लवकरच त्या मृत्यू पावल्या. त्यावेळी भीमराव अवघ्या सहा वर्षाचे होते.
**  इ.सन.१९०० मध्ये भीमराव साताराहायस्कूल मध्ये शिक्षणा साठी आले. ईंगरजी शाळेत प्रवेश झाल्याने भीमाला ती शाळा फारच आवडली. पण शाळेतील वातावरण ….? आपण शिकलेल्या क्य्म्प मधील व येथील शाळेत फार फरक आहे.  हे भीमाच्या चाणाक्ष मनाने ताबडतोब हेरले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईस आले भीमाने तेथे एल्फ़िन्सटन हायस्कुलात प्रवेश केला. जातीने अस्पृश्य असल्याने भीमाला ईच्छा असूनही संस्कृत चा अभ्यास करता आला नाही. पार्शियन भाषेत त्याचा नंबर असे. आनंदाची अभ्यासातील प्रगती बेताचीच असल्याने त्यास नोकरीला लावले. नंतर आनंद व भीमाची लग्ने केली. लग्नाचे वेळी भीमा चौदा वर्षाचा व व रमाबाई वर्षाची होती.
**  आपल्या मुलालाप्रखर बुद्धी मत्तेची दैवी देणगी लाभलेली आहे हे ओळखून रामजींनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईस पाठविले. हिंदू समाजातील एका अडाणी व क्रूर रूढी मूळे त्या काळी अस्पृश्य गणल्या जाणाऱ्यां जातीत जन्मल्या मुळे शिक्षणात त्यांचा काहीजणांन कडून अपमान व्हायचा पण त्यातही त्यांच्यावर प्रेम करणार्या केळुसकर गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामूळे भीम उत्तम तऱ्हेने दहावी पास झाला. व बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून एल्फ़िन्स्टन कॉलेजात गेला. त्यांच्या चाळीत त्यांचा मोठा सत्कार केला.
** १९१२ साली ते बी.ए. झाले बडोद्याच्या महाराजांच्या ऋणातून अल्पसे मुक्त होण्यासाठी त्यानि त्यांचे कडे नोकरीचा अर्ज केला.त्यांना गायकवाडांकडे  नौकरी मिळाली. परंतु वडील आजारी असल्याची तार मिळताच ते मुंबईस निघाले. घरी गेल्यावर समजले मुलाचा चेहरा पाहण्यासाठी वडील आतुर झाले होते.त्यांचा चेहरा पाहताच वडीलांनी त्याच्या वरून प्रमाणे हात फिरविला व व त्या महान पुरुश्याने ह्या जगाचा निरोप घेतला.
**  त्यानंतर ते अमेरिकेत शिक्षणाकरीता गेले. तेथे एखाद्या तपस्व्या प्रमाणे दिवसाचे १८ तास ते अभ्यासात घालवु लागले.१९१५ साली ते एम. ए. झाले. त्या नंतर त्यांनी २, ३ विषयांवर प्रबंध लिहिले.या कष्टाचे फळ म्हनूण  १९२४ साली ते कोलम्बिया विद्यापीठाने त्यांना “डॉ ऑफ फ़िलॉसॊफ़ी” हि पदवी मिळाली. सरकारी कचेरीत त्यांना मोठ्या हुद्याची जागा मिळत नसे. हाता खालचे लोक देखील त्यांच्या टेबलावर दुरून फाईल टाकीत. मानी भीमरावांना हि वागणूक पसंत नसूनही त्यांचा स्वाभिमान दुखावला जात असे. म्हणून ते मुंबईला परतले. त्यांनी आपला धीर खचू दिला नाही.तरीही खटपट करूनही त्यांनी सिडेनह्यम कॉलेज मध्ये प्राध्यापकाची जागा मिळविली. पैसा जमविला व १९२० साली उरलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा लंडन ला रवाना झाले. तेथे त्यांनी निरनिराळ्या ग्रंथालयात पुस्तके वाचून आणि त्याच बरोबर आभ्यास हि चालू ठेवला. याचे फळ म्हणून त्यांना १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाने “डॉ ऑफ सायन्स” हि पदवी दिली.
** अस्पृश्य समाजा साठी स्व: काहीतरी करावे असे त्यांना मनापासून वाटे. यामुळे त्यांच्यात एक प्रकारे चैतन्य निर्माण होई.व त्यांनी पाउल पुढे टाकले.पहिली सुरवात म्हणजे त्यांनी १९२० साली त्यांनी सुरु केलेले पाक्षिक पत्र  ‘मूकनायक’ हेच होय. त्यानंतर त्यांनी महाडच्या तळ्यातील सर्वांसाठीच म्हणजे अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हते. पाणी हेच जीवन  त्यांच्या पासून हिरावल्या जाते,या साठी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. मार्च १९२७ रोजी सत्याग्रही तळ्याकडे निघाले.माणुसकीचे हक्क व निसर्गाची देणगी हे पाणी मिळवायचेच ईतक्यासाठी आंबेडकर पुढे होऊन सत्याग्रह सुरु झाला. अस्पृश्य म्हणून ज्यांनी मुंबईच्या कॉलेजात पाण्यासाठी हाल सोसलेत, बडोद्याच्या हॉटेल मध्ये ज्यांनी मार खाल्ला ते आंबेडकर खरोखरच सत्याग्रहींचे सेनापती शोभत होते.
पाण्याचा घोट घेऊन त्यांनी ईतरान्ना पाणी पिण्याची मोकळीक दिली.पुढे पुढे त्यांच्या कार्याची प्रगती होऊ लागली.
**पाच वर्षे झगडत राहिल्याने १९३५ साली नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला. याच काळात त्यांनी “बहिष्कृत भारत” नावाचे नियतकालिक सुरु केले. ** आपल्या भारत देश्यात इंग्रजांचे राज्य होते.१५ ऑगष्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्या नंतर भारतातल्या लोकांना विशिष्ट पद्धतीने राज्य कारभार करता यावाया साठी भारताची स्वतंत्र राज्य घटना असणे आवश्यक झाले.त्या दृशीने भारतीय विद्वानांची एक तज्ञ समिती निर्माण करण्यात आली.त्यामध्ये ते प्रमुख होते. त्यांची कायदा मंत्री म्हणून निवड झाली.त्यावेळी घटना लिहिण्याचे काम त्यांच्या कडे देण्यात आले.त्यांनी अहोरात्र कष्ट करून आपल्या अंगी असलेली बुद्धिमत्ता प्राणपणाला लावली १९४८ च्या फ़ेब्रुआरित घटना लिहून पूर्ण केली. त्यामुळे त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून संबोधन्यात आले. त्यानंतर त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ पास करून घेतले. अस्पृष्यान साठी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय, व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय  काढलेत.
** “पिकते तेथे विकत नाही” आपल्या जवळ असलेल्या माणसाचे गुण आपण जाणू शकत नाही.दूरच्या माणसाला त्याची परख होते. म्हणून १जून १९५२ रोजी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने ‘ डॉ ऑफ लों ‘ हि पदवी देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी  स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकषाही तत्वाचा पुरस्कार करणारे अनेक ग्रंथ लिहिले, भाषणे दिली. आणि आपली द्लीतांबद्दलची भूमिका स्पष्ट केली. शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, राजकारण या सर्वांमध्ये त्यांनी आपले स्वतंत्र तर्कशुद्ध विचार मांडून दाखविले. दलित समाजात जागृती निर्माण झाली तेव्हा त्यांना ज्ञानाचे महत्व पटले.आजही त्यांच्या नावाने कितीतरी कार्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे कार्यरत आहेत.
** त्यांचा हिंदू धर्मातील पाखंडी संतांना विरोध होता. भारत देश्यावर त्यांचे अलोट प्रेम होते. त्यामुळे हिंदू धर्मातून पर धर्मात जाण्याचा विचार करतानाहि भारतातच उगम पावलेल्या आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. नागपुरात त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत १४ आक्टोंबर १९५६ रोजी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांचे सर्व आयुष्य कष्टात गेले. जातीने अस्पृश्य असल्याने लहानपणी लोकांकडून त्यांची हेटाळणी झाली. त्यातून मार्ग काढण्या साठी त्यांनी उच्च शिक्षण घेतले. व मोठेही झाले त्यामानाने त्यांना हवी असलेली समानतेची वागणूक मिळेना! ती मिळण्या साठी त्यांना अनेक गोष्टीन सोबत झगडावे लागले.  अनेक गोष्टीना तोंड द्यावे लागले. पैश्याच्या अडचणी तून मार्ग काढावे लागले. त्यासाठी त्यांनी उन्हातान्हाची पर्वा न करता अतोनात कष्ट केले. त्यामध्ये साहजिकच त्यांची प्रकृती ढासळत गेली. आणि रक्तदाब, मधुमेह, या रोगाने त्यांचे शरीर थकले.
**   दलित समाजा साठी अविरत कार्य करणारा आणि शिका, संघटीत व्हा, व संघर्ष करा, असा मुलमंत्र देणारा हा मांनव धम्माचा उपासक आपल्या कर्तुत्वाच्या स्मृती मागे ठेवून ६ डिसेंबर १९५६ रोजी या विश्वाला सोडून गेला. मरणोत्तर त्यांना “भारत रत्न” हा किताब भारत सरकारने बहाल केला. अश्या या थोर पुरुष्याला आमच्या सर्वांचे कोटी कोटी विनम्र अभिवादन !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📚  मराठी निबंध / भाषण -2  

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा
जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या
पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी
आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून
 दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात
ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली
 पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या
आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची
व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम
 व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे

 विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.
डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती.
सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ
वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.

डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते.

शैक्षणिक विचार:
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.

सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा :
डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, '' आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा '' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे.

स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे कैवारी :
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.
अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📚  हिंदी  निबंध / भाषण - 1 

भारत को संविधान देने वाले महान नेता डा. भीम राव अंबेडकर का जन्म 14 अप्रैल 1891 को मध्य प्रदेश के एक छोटे से गांव में हुआ था। डा. भीमराव अंबेडकर के पिता का नाम रामजी मालोजी सकपाल और माता का भीमाबाई था। अपने माता-पिता की चौदहवीं संतान के रूप में जन्में डॉ. भीमराव अम्बेडकर जन्मजात प्रतिभा संपन्न थे।

भीमराव अंबेडकर का जन्म महार जाति में हुआ था जिसे लोग अछूत और बेहद निचला वर्ग मानते थे। बचपन में भीमराव अंबेडकर (Dr.B R Ambedkar) के परिवार के साथ सामाजिक और आर्थिक रूप से गहरा भेदभाव किया जाता था। भीमराव अंबेडकर के बचपन का नाम रामजी सकपाल था. अंबेडकर के पूर्वज लंबे समय तक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी की सेना में कार्य करते थे और उनके पिता ब्रिटिश भारतीय सेना की मऊ छावनी में सेवा में थे. भीमराव के पिता हमेशा ही अपने बच्चों की शिक्षा पर जोर देते थे।

1894 में भीमराव अंबेडकर जी के पिता सेवानिवृत्त हो गए और इसके दो साल बाद, अंबेडकर की मां की मृत्यु हो गई. बच्चों की देखभाल उनकी चाची ने कठिन परिस्थितियों में रहते हुये की। रामजी सकपाल के केवल तीन बेटे, बलराम, आनंदराव और भीमराव और दो बेटियाँ मंजुला और तुलासा ही इन कठिन हालातों मे जीवित बच पाए। अपने भाइयों और बहनों मे केवल अंबेडकर ही स्कूल की परीक्षा में सफल हुए और इसके बाद बड़े स्कूल में जाने में सफल हुये। अपने एक देशस्त ब्राह्मण शिक्षक महादेव अंबेडकर जो उनसे विशेष स्नेह रखते थे के कहने पर अंबेडकर ने अपने नाम से सकपाल हटाकर अंबेडकर जोड़ लिया जो उनके गांव के नाम "अंबावडे" पर आधारित था।

8 अगस्त, 1930 को एक शोषित वर्ग के सम्मेलन के दौरान अंबेडकर ने अपनी राजनीतिक दृष्टि को दुनिया के सामने रखा, जिसके अनुसार शोषित वर्ग की सुरक्षा उसकी सरकार और कांग्रेस दोनों से स्वतंत्र होने में है।

अपने विवादास्पद विचारों, और गांधी और कांग्रेस की कटु आलोचना के बावजूद अंबेडकर की प्रतिष्ठा एक अद्वितीय विद्वान और विधिवेत्ता की थी जिसके कारण जब, 15 अगस्त, 1947 में भारत की स्वतंत्रता के बाद, कांग्रेस के नेतृत्व वाली नई सरकार अस्तित्व में आई तो उसने अंबेडकर को देश का पहले कानून मंत्री के रूप में सेवा करने के लिए आमंत्रित किया, जिसे उन्होंने स्वीकार कर लिया। 29 अगस्त 1947 को अंबेडकर को स्वतंत्र भारत के नए संविधान की रचना के लिए बनी संविधान मसौदा समिति के अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया। 26 नवंबर, 1949 को संविधान सभा ने संविधान को अपना लिया।

14 अक्टूबर, 1956 को नागपुर में अंबेडकर ने खुद और उनके समर्थकों के लिए एक औपचारिक सार्वजनिक समारोह का आयोजन किया। अंबेडकर ने एक बौद्ध भिक्षु से पारंपरिक तरीके से तीन रत्न ग्रहण और पंचशील को अपनाते हुये बौद्ध धर्म ग्रहण किया। 1948 से अंबेडकर मधुमेह से पीड़ित थे. जून से अक्टूबर 1954 तक वो बहुत बीमार रहे इस दौरान वो नैदानिक अवसाद और कमजोर होती दृष्टि से ग्रस्त थे। 6 दिसंबर 1956 को अंबेडकर जी की मृत्यु हो गई।

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📚  इंग्रजी  निबंध / भाषण - 1 


'Bhimrao Ramji Ambedkar' was born on 14 April 1891 in Mhow town of Madhya Pradesh, India. He was the son of Ramji Maloji Sakpal and Bhimabai. His father served in the Indian Army at the Mhow cantonment. He became one of the first Dalit (untouchables) to obtain a college education in India. Eventually earning a law degree and doctorates for his study and research in law, economics and political science.

Bhimrao Ramji Ambedkar is popularly known as 'Babasaheb'. He was an Indian jurist, political leader, philosopher, anthropologist, historian, orator, economist, teacher, editor, prolific writer, revolutionary and a revivalist for Buddhism in India. He became the 1st Law Minister of India. He became the Chairman of the Constitution Drafting Committee. For his contributions, he was awarded with 'Bharat Ratna'.

Ambedkar died on 6 December 1956 at his home in Delhi.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📚   इंग्रजी  निबंध / भाषण - 2 

Dr.Bhimrao Ambedkar was born in a Mahar family at Mhow in Madhya Pradesh, central India on 14th April 1891. His father Ramjirao was a Subedar major in the military. At the age of five, he lost his mother. Bhimrao passed his B.A. examination from the Elphinston College in Bombay. He went to America and joined the Columbia University. He completed his M.A. and Ph.D . Dr. Ambedkar studied law in England. In 1923, he returned to India as a barrister. He started his practice at Bombay High Court.  Dr. Ambedkar worked for welfare of depressed classes.  He tried to spread education among them and improve their economical condition.  He gave to his people self respect, dignity and most importantly moral courage to fight .  He strongly fought against the caste system in India and published a book, “Annihilation of caste” in which he strongly criticized the then existing discrimination in Indian society.
Dr. Ambedkar was greatly influenced by three great men, Lord Buddha, Kabir and Jyotiba Phule. Bhimrao Ramji Ambedkar is popularly known as ‘Babasaheb’. He played an important role in framing Indian Constitution. So he is called the father of the Indian Constitution. Dr. B.R.Ambedkar was the first law minister of independent India. He is known for his work as a lawyer, economist, politician and professor. For his contributions, he was awarded with ‘Bharat Ratna’.  Dr. Ambedkar died on 6th December 1956. His birthday is celebrated as Ambedkar Jayanti and is a public holiday.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🎶 भिम कविता ..! 🎶

मित्रा ,
त्यांनी त्रिशुलाचे वाटप 
धर्मरक्षणासाठी केले म्हणे 
तू मात्र भेगाळलेल्या जमिनीत 
पंचशील पेरीत बसलास 
त्यांना धर्मासाठी 
माणसे कापलेली चालतात 
तू मात्र माणसांसाठी 
धर्म बाजूला सारत गेलास 
ते काढतीलच त्रिशूल बाहेर कधी नं कधी 
धर्मयुद्धासाठी 
तोवर तू शांत बस 
पण त्रिशुलाच्या टोकावर 
माणसं तरंगू लागतील तेव्हा 
तुझ्या अंगणातील बोधीवृक्षाला 
तू तलवार टांगून ठेव .
 कवी - मच्छिंद्र चोरमारे, नागपूर...!
______________________________________________________
लाजतो कशाले ??

मह्या भीमाच्या नावावर

तू मरू रायले खिशाले 

मंग 'जय भीम' घालतानाच 

भऊ, लाजतो कशाले ?

भिमामुळे तं मिळाली तुले 
बगला, गाडी-माडी
तुही बायको बी नेसू रायली आज टकाटक साडी 
अन भिमामुळे तं मिळाली तुला खुर्ची बसाले. मंग .....
भिमामुळे तं भाऊ तुहा

पोरगा साळत जाऊ रायला 

अन कालरशिपच्या भरवशावर

सायब व्हयून ऱ्हायला

सुटा-बुटाच्या डरेसात लावतो पेन खिशाले . मंग....

शायनीत हिंडू रायला 

अन करू रायला थाट

भिमामुळ तं गेला भाऊ

तुह्यावाला सारा बाट

मांजरावाणी राहत होता, आता पिळू रायला मिशाले. मंग....

ज्याच्यामुलं गड्या 

तू सुखानं जगू रायला

त्या भीमा-बापाशीच कामून 

फटकून वागू रायला ??

बोला ना 'जय भीम' जोराने, ताण पडू दे ना घशाले.

मंग 'जय भीम' घालतानाच 

भाऊ, लाजतो कशाले ?

 कवी - शेख बिस्मिल्ला, मु.पो. सोनोशी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा

_______________________________________________________
माझा भीमराणा 
नव्हता कोणा समान माझा भीमराणा...!
ना गांधी समान ना नेहरू समान
ना कधी गांधीसारखा दहावीत नापास झाला
ना कधी नेहरू सारख्या त्याने पोरी फिरवल्या
असा होता माझा भीमराणा...!
ना गांधी सारखा हडकुळा
ना नेहरू सारखा काटकुळा 
धिप्पाड देहयष्टी स्पष्ट वक्ता 
असा होता माझा भीमराणा ...!
लढला तो जीवनभर दलितांसाठी
पण कधी हाती तलवार या बंदूक घेतली नाही
ना टिळकांसारखी अंधश्रधा बाळगली (गणपती बसवून)
असा होता माझा भीमराणा....!
पांडित्यपूर्ण शैली त्याची भाषणाची 
दमदार  लेखणी कसदार वाक्य रचना
कधी उपोषणास ना बसला
कारण रोजच त्याला उपवास घडत असे
१ चाय आणि १ पाव खावून राहावे लागे
मग वेगळा उपवास करायची गरज काय
पण कधी ना हरला ना कधी झुकला
असा होता माझा भीमराणा...!

कवी - विनोद पवार
_______________________________________________________

बापाचा बाप
बापाचा  बाप भीम माझा होता
झाला नाही तैसा आजवर नेता //
अस्पृश्य जनता होती अंधारात
क्रांती केली ऐसी आणली माणसात
कार्य ऐसे कोणा जमणार ना आता // १ //
अंधरूढी अंधश्रद्धा गाडील्या भीमाने
मनूच्या मनुस्मृतीला जाळिले भीमाने
दिधला ज्याचा धम्म तो बुद्ध होता // २ //
ज्ञानाचा सागर होता भीम माझा
जगात त्याचा होई गाजावाजा
घटना ऐसी लिहिली तो बुद्धिदाता // ३ //
बावीस प्रतिज्ञा औषध दिधले
सन्मार्गाने जगण्या पाळा ते वदले
विनोदा तो होता आपला मार्गदाता // ४ //
कवी - विनोद पवार
__________________________________________________
मातीचे सोने झाले भीमा तुझ्या मुळे


जीवनात सुख आले भीमा तुझ्या मुळे

 ज्वलंत  संघर्षाची चाखतो आम्ही गोड फळे

मानवा बुद्ध नीतीशी भीम पर्व हे जुळे

१४ ऑक्टोबरचा सोहळा महान

नाग लोकांची ती भूमी झाली पहा पावन

नील नभात नीला शालू ल्याली

आनंदाने रजनी निळी निळी झाली
अवतार घडले इथे देवांचे लाख जथे
तरीना मुक्ती पथे नाही कल्याण इथे
भीमाने वळविले विश्व हे बुद्धा कडे
भीम रायाने शिंपले पहा अमृताचे सडे


कवी - विनोद पवार
___________________________________________________
तुझ्यामुळे भीमा
तुझ्यामुळे भीमा सुख मिळे आम्हा
बुद्ध धम्माचे मंथन कळाले
सुख समृद्धी आंदन मिळाले ||
जाती यतेची हि लढाई तुम्ही जिंकिली
ज्ञानाची क्षितिजे सारी तुम्ही तोडिली
तुमच्या ज्ञानापुढे गगन हे ठेंगणे
तुम्हा हृदयाचे स्पंदन कळाले ||१ ||
देशाची घटना लिहून झाला घटनाकार
भाग्य देशाचे या थोर झाला शिल्पकार
घटना लिहिली अशी आहे बावनकशी
आम्ही घटनेला वंदन हे केले || २ ||
सनातनी हिंदुनी केले होते हैराण
माणूस न्हवे माणसातील होते सारे हैवान
बुद्धा शरण जावून विनोदा बौद्ध करून
बौद्ध धम्माचे इंधन तू दिधले || ३ ||

कवी - विनोद पवार
________________________________

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad